तुरीची मुळे खोलवर जात असल्यामुळे जमीन खोल नांगरून वखराच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. उत्तम प्रकारच्या मशागतीमुळे मुळांची वाढ चांगली होते. शेवटच्या वखराच्या पाळीच्या अगोदर एकरी १५ ते २० गाड्या कुजलेले कंपोस्ट खत अथवा शेणखत जमिनीत चांगले मिसळावे .
अधिक उत्पादनासाठी कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या सुधारित वाणांची
निवड करावी मुख्यत्वेकरून मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम वाणांची निवड
करावी. जसे की बीडीएन-७११ (पांढरी तुर), बीडीएन २०१३-४१(पांढरी
तुर), बीएसएमआर ८५३ (पांढरी तुर). लागवडीसाठी अयोग्य वाण –
आयसीपीएल ८८६३ हा वाण मारुती या नावाने प्रचलित आहे. हा वाण मर
रोगास मोठया प्रमाणात बळी पडतो म्हणून हा वाण लागवडीस योग्य नाही.
अधिक उत्पादनासाठी तसेच जमिनीची उत्पादकता राखण्यासाठी सोयाबीन+ तूर आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास अधिक फायदा होतो .
२५ किलो स्फुरद व ५० कि नत्र (NPK: २५:५०:००) तुरीची जोरदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी २५ किलो युरिया आणि १२/३२/१६ दोन बॅग जमिनीतून द्यावे. जमिनीत पालाशची कमतरता असल्यास हेक्टरी ३० किलो पालाश द्यावे. तसेच हेक्टरी २० ते २५ किलो गंधक जिप्सम मधून
वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे. (सिंगल सुपर फॉस्फेट खत
वापरल्यास वेगळा गंधक देण्याची आवश्यकता नाही). जमिनीत जस्ताची
कमतरता असल्यास पेरणीपूर्वी प्रति हेक्टरी १५ किलो झिंक सल्फेट
वापरल्यास उत्पादनात २५ टक्के पर्यत वाढ होते. कोरडवाह तुर पिकामध्ये दोन टक्के युरिया पीक फुलावर येत असताना आंतरपीक काढल्यानंतर १५ दिवसांच्या आत फवारणी केल्यास फायदा होतो.
पीक २० ते २५ दिवसांचे असताना पहिली आणि त्यानंतर ३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी तुरीचे पीक पेरणीपासून ४५ दिवसांपर्यत तणविरहित ठेवल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते. यानंतर आंतर मशागत केल्यास मुळ्या तुटण्याचा धोका असतो व मर रोग येण्याची शक्यता असते.
शाखीय वाढ रोखण्यासाठी पेरणीनंतर ९० दिवसांनी सायकोसिल ८० पीपीएम (८० मिली लिहोसीन) ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. फुलगाठ होऊ नये म्हणून १५ ते २० पीपीएम एनएएची ४ ते ५ मिली
प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पिकास सुरुवातीच्या काळात १५ ते २० दिवस आणि शेंगा तयार होण्याच्या काळात २५ ते ३० दिवस पाण्याचा ताण पडल्यास पाणी देणे आवश्यक आहे.
१. कळ्या धरताना २. फुलोऱ्यात ३. शेंगात दाणे भरताना या अवस्थेत जमिनीत ओलावा नसल्यास पाण्याच्या पाळ्या देणे आवश्यक आहे.
घाटेअळी: कामगंध सापव्व्यात सलग दोन ते तीन दिवस आठ ते दहा पतंग प्रति सापळा .
घाटेअळी : प्रत्येक मीटर ओळीवर फुलोऱ्याच्या वेळी किंवा फुलोऱ्यानंतर
कधीही २ अळ्या किंवा ५ टक्के शेंगांचे नुकसान.
पाने गुंडाळणारी अळी व पिसारी पतंग : ५ अव्व्या प्रति १० झाडे.
शेंग माशी : ५ टक्के हिरव्या प्रादुर्भावग्रस्त शेंगा.
तूर पिकावर प्रामुख्याने आढळून येणारे महत्वाचे रोग म्हणजे मर आणि वांझ रोग
होय. या रोगाच्या व्यवस्थापनासाठी पिकांची फेरपालट, रोगप्रतिकारक जातींचा
वापर , पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २ ते २.५ ग्रेंम थायरम किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी आणि रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
शेंगा पक्क झाल्यानंतर तुरीचे पीक कापून खळ्यावर २ ते ३ दिवस
वाळवावे त्यानंतर काठीने झोडपून पुढचा व दाणे अलग करावेत त्यानंतर २ ते ३ दिवस पुन्हा धान्य चांगले वाळवावे व नंतरच साठवणूक करावी
शेंडा खडणी : .
लागवडीमधील अंतर जोड वळ पद्धत :
लागवडीतील अंतर चार चार फुटावर रोगुट्या मारायच्या पहिल्या ४ फुटावर व दुसऱ्या ४ फुटावर लावगड करायची व तिसऱ्या ओळ न लावता सोडायची याला जोड वळ पध्दत असे म्हणतात व दोन रोपातील अंतर दीड फुट ठेवायच.
टिप : वरील द्रावन कुठल्या ही बुरशीनाशका सोबत फवारणी करू नये (उपरोक्त प्रयोग शेतकऱ्यांनी आपल्या जबाबदारीवर करावेत).
संपर्क क्रमांक